संघटीत समाजाची प्रगती कोणीही रोखू शकत नाही- माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम

0
संघटीत समाजाची प्रगती कोणीही रोखू शकत नाही- माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम


क्रिष्णा गावडे/तालुका प्रतिनिधी 
अहेरी:-
 समाजात एकता व संघटितपणा असल्यास,त्या समाजाची प्रगती व विकास कोणीही रोखू शकत नाही.व समाजाचा सर्वांगीण विकास होतो,असे प्रतिपादन करित कुणबी समाज भवनासाठी भरीव मदत करण्याची ग्वाही माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिली.
अहेरी येथील राजे धर्मराव कृषी विद्यालयाच्या प्रांगणात रविवारी २९ ऑक्टोबर रोजी अखिल कुणबी समाजाच्या कोजागिरी निमित्य स्नेहमीलन सोहळा व समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी ते उदघाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी जि. प.च्या माजी अध्यक्ष आशाताई पोहणेकर होत्या.सत्कारमूर्ती म्हणून राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त जयश्री खोंडे,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त चंद्रपुर येथील परिचारिका पुष्पा पाचभाई,दिनकर जिवतोडे,वामन देवाळकर,विठ्ठल नागापुरे,महादेव मस्की,जीवनराव गोंडे प्रमुख अतिथी म्हणून कुमार अवधेशराव बाबा आत्राम,पोलिस उपनिरीक्षक करिष्मा मोरे,प्रा.डॉ. संतोष डाखरे,आदी उपस्थित होते.तत्पुर्वी समाजाच्या वतीने राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सत्कारमुर्तीसह ईयत्ता दहावी व बारावीतील गुणवतांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान राजे विश्वेश्वरराव महाविद्यालय भामरागडचे प्रा.डॉ.संतोष डाखरे यांच्या "विश्वातील अपरिचित देश आणि भारत" या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.प्रास्ताविक प्रवीण बुरान यांनी केले.संचालन जिजा गोहोकर तर आभार मारोती गौरकर यांनी मानले.यशस्वीतेसाठी आशाताई पोहणेकर, दिवाकर वाघमारे, प्रवीण बुरान,यादव धानोरकर,मारोती गौरकर,मारोती पिपरे,प्राचार्य अनिल भोंगळे,गीता जिवतोडे,घनमाला जामुनकर आदीसह समाजबांधवांनी सहकार्य केले

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !