धक्कादायक! शस्त्रक्रिया प्रसूतीनंतर दोन महिला दगावल्या त्यानंतर तिसरीही महिला दगावली

0
धक्कादायक!

शस्त्रक्रिया प्रसूतीनंतर दोन महिला दगावल्या त्यानंतर तिसरीही महिला दगावली


शस्त्रक्रिया प्रसूतीनंतर दोन महिला दगावल्या त्यानंतर तिसरीही महिला दगावली

शस्त्रक्रिया योग्य पद्धतीने झाली नाही म्हणूनच ह्या महिलांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे


गडचिरोली शहरातील महिला व बाल रुग्णालयात 'सिझेरियन' प्रसूतीनंतर दोन मातांचा मृत्यू, झाला त्यानंतर त्याच शस्त्रक्रियेतील एक महिला अत्यंत गंभीर होती तीला पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहे मात्र दि ३ आक्टोंबर ला तिची प्राणज्योत मावळली

शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टर वर चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी व जे जीवीत बाळ आहेत त्यांचा संगोपनासाठी शासनाने मदत करावी अशीही मागणी सामान्य जनतेकडून केली जाते आहे



गडचिरोली शहरातील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात 'सिझेरियन' प्रसूतीनंतर दोन महिलांचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली होती दरम्यान मृतकांच्या नातेवाईकांनी उपचारात हयगय झाल्यामुळे दोघींनाही जीव गमवावा लागल्याचा आरोप केला होता त्यांच्या बरोबर सिझरिंग झालेली महिला नागपूर येथे दि ३ आक्टोंबर ला मृत्यू पावली

दरम्यान तिचे बाळ सुखरूप आहे .
रजनी प्रशांत शेडमाके (२३) रा. शिवणी ता. गडचिरोली. व उज्ज्वला नरेश बुरे (२७), रा. मुरखळा चक, ता. चामोर्शी (हल्ली मुक्काम इंदिरानगर, गडचिरोली) अशी मृत महिलांची नावे आहेत. तर ३ आक्टोंबर ला मरण पावलेल्या महिलेचे नाव वैशाली सत्यवान मेश्राम रा आष्टी असे आहे

रजनी शेडमाके हिला प्रसुतीसाठी २२ सप्टेंबर तर उज्ज्वला बुरे हीला २४ सप्टेंबर ला तर वैशाली मेश्राम हीला २३ सप्टेंबर रोजी महिला रूग्णालयात भरती करण्यात आले होते. तपासणीनंतर या सर्व महिलांची २४ सप्टेंबर रोजी शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली. दरम्यान दोन दिवस या दोन्ही माता सुखरूप होत्या. मात्र चौथ्या दिवशी रजनी शेडमाके व उज्ज्वला बुरे हिला ताप आला. दरम्यान प्रकृती खालावल्याने लागलीच जिल्हा सामान्य रूग्णालयातून फिजीशीयनला बोलाविण्यात आले.

त्यानंतर २७ सप्टेंबरला दोघींनाही जिल्हा व सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु सायंकाळी रजनी शेडमाके हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर उज्ज्वला बुरे हिला नागपूरला हलविण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान, नागपूरला नेण्यात येत असताना रात्री ११ वाजताच्या सुमारास आरमोरीजवळ उज्ज्वला बुरे हिनेही प्राण सोडला तर वैशाली हीलासुद्धा नागपूर ला हलविण्यात आले होते मृत्यूशी झुंज देत असताना तिची काल ३ आक्टोंबर ला झुंज संपली तीघींचेही बाळ सुखरुप आहेत. परंतु आईविना तिघेही पोरके झाले आहेत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिन्ही महिलांना जीव गमवावा लागल्याचा आरोप मृतकांच्या नातेवाईकांनी केला आहे.
आता त्या बांळांचे संगोपण करावे कसे असा यक्षप्रश्न त्यांच्या नातलगांना पडला आहे मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकावा बाळासाठी घरी थांबावे
बाळासाठी घरी बसल्यास कुटुंबातील लोकांचे पालन पोषण कसे करणार असाही प्रश्न उपस्थित होतो आहे
त्याकरिता सदर बाळांचे पालनपोषण करण्याची जबाबदारीची शासनाने स्वीकारावी अशीही मागणी सामान्य जनतेकडून केली जाते आहे

समिती करणार चौकशी

सदर दोन मातांचा मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली चार तज्ज्ञांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण कळेल. यात कुणी दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले. मात्र आता तिसरीही महिला दगावली आहे

सदर दोन मातांचा मृत्यू कशामुळे झाला हे आताच सांगता येत नाही. चौकशी समितीचा अहवाल व शवविच्छेदनाचा अहवाल
प्राप्त झाल्यावर मृत्यूचे नेमके कारण कळणार आहे. परंतू आता तिसरीही महिला दगावली तर डॉ माधूरी किलनाके केव्हा आपण चौकशी कराल मृतक महिलांना न्याय मिळवून देणार असे जिल्ह्यातील नागरिकांना वाटते आहे

- डॉ. माधुरी किलनाके, वैद्यकीय अधिक्षक, जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !