बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळेच भारत देशाची एकता व अखंडता कायम - रणजित माने
अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता
डोंगरगाव (ता. मंगळवेढा)-:महामानव प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच भारत देशाची एकता व अखंडता कायम आहे ; असे प्रतिपादन मंगळवेढा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी केले.
ग्रामपंचायत डोंगरगाव व रमाई फौंडेशन यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या डोंगरगाव येथील जयंती उत्सव समारंभात ते बोलत होते.समारंभाच्या अध्यक्षस्थानी डोंगरगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. सारिका विवेक खिलारे ह्या होत्या.
सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी आपल्या प्रास्ताविक भाषणात बोलताना आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते डी. के. साखरे म्हणाले की ज्यांना माणुसपण नाकारले होते त्यांना माणुसपण मिळवून देण्याचे काम बाबासाहेबानी केले. त्यामुळे या देशातील दलित,शोषित,पीडित माणूस आज ताठ मानेने जगु लागला. तर डोंगरगाव शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील आपल्या भाषणात म्हणाले की बाबासाहेबांनी शिका, संघटीत व्हा, व संघर्ष करा असा महामंत्र दिला. त्यामुळे दलित व गरीब समाजाला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. तर भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेश सचिव विवेक खिलारे म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे या देशावर अनंत उपकार असून त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच आपल्याला आज सर्व हक्क प्राप्त झाले आहेत. बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गाने वाटचाल करणे हीच त्यांची खरी जयंती ठरणार आहे.या प्रसंगी भाजपा ओबीसी सेलचे जिल्हा सचिव ऍड. बापू मेटकरी व तालुका अध्यक्ष धनाजी गडदे यांचीही समयोचित भाषणे झाली.
यावेळी डोंगरगाव उपकेंद्राच्या डॉ. सपना राठोड, उपसरपंच प्रदीप चौगुले, ग्रामसेवक सुशांत कसबे,आण्णासो मोहिते सर ,माजी सरपंच शंकर मेटकरी, अमोल मेटकरी,ज्योतीराम क्षीरसागर, शरद हेंबाडे, ज्ञानेश्वर साखरे, वैशाली चंदनशिवे, पंकज मस्के, बाबा सय्यद, शब्बीर सय्यद, सखुबाई साखरे,नारायण मोरे, सिद्धेश्वर बाबर, दादा खिलारे, डॉ. नंदकिशोर शिंदे, विजय मेटकरी सर, नागेश नरळे, माधुरी चंदनशिवे यांच्या सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.