आष्टी (अशोक खंडारे):-
काल दिनांक २१ मे २०२५ ला सायंकाळी तीन ते चार वाजताचे दरम्यान विजेच्या कडकडासह
अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामध्ये ईलुर शेतातील एका बाभळीच्या झाडावर विज कोसळली त्या झाडाखाली आश्रयाला असलेल्या नव बकऱ्या ठार झाल्या आहेत
घटनेची माहिती महसूल अधिकाऱ्यांना मिळताच तलाठी सचीन गुरनुले यांनी घटनास्थळी धाव घेतली पशू वैद्यकीय अधिकारी यांना पाचारण करून पंचनामा करून सदर अहवाल शासनाला पाठविला आहे
या नव बकऱ्या ठाकरी येथील राजन्ना पेरमवार यांच्या चार,राजू जिल्लेवार एक,सदाशीव बोलगोडवार दोन,बाबुराव वर्धलवार दोन अश्या नव बकऱ्या ठार झाल्या आहेत
विज कोसळल्याने मृत बकऱ्याच्या पशुपालक यांना शासनामार्फत तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे