रामक्रिष्णपूर येथील चार गुरे एका शेतकऱ्याच्या शेतात मृत्यू पावले?
विज वितरणचे अधिकारी, कर्मचारी म्हणतात विद्युत करंटने जनावरे दगावली नसून झटका मशीनने दगावली
वन विभाग जंगला शेजारी असलेल्या शेतकऱ्यांना झटका मशीन का वाटत आहे?
आष्टी : -
चामोर्शी तालुक्यातील आष्टी विज वितरण कार्यालय अंतर्गत येत असलेल्या रामक्रिष्णपूर येथे दि.२० मार्च ला एका शेतकऱ्याच्या शेतात दुपारच्या सुमारास करंट लागून चार पशूधन मृत पावले ही घटना कुनालाही कळू नये म्हणून त्या शेतकऱ्यानी शेजारच्या शेतात काम करीत असलेली जेसीबी बोलावून खड्डा करून त्यात चारही जनावरे पुरली.
जर झटका मशीन ने चारही पशुधन मृत पावले तर ज्या पशुपालकाचे ते पशुधन होते त्यांना कळविण्यात आले नाही व परस्पर ते पुरण्यात आले
हि खबर गावात लागताच त्या शेतकऱ्यास असे का केले असी विचारले असता त्याने तुमचे ते मृत पावलेले पशूधन मी तुम्हाला माझ्याकडील देतो असे म्हटले व तिन पशुधन त्यांना दिले त्यामुळे त्या पशुपालकांनी कोणतीही तक्रार केली नाही
मात्र आजपर्यंत च्या इतिहासात झटका मशीन ने जनावरे मृत्युमुखी पडतात हे पाहायला मिळाले नाही मग एकाचवेळी चार जनावरे कशी काय मृत्यू मुखी पडली असा प्रश्न उपस्थित होते आहे
जर झटका मशीन ने जनावरे मृत्यू पावत असतील तर वन विभाग वनशेजरी असलेल्या शेतकऱ्यांना झकटा मशीन का वाटप करीत आहे म्हणजे जंगलात असणारे जनावरे शेतकऱ्यांनी मारुन टाकावे असा उद्देश आहे का?
सदर घटना ही इलेक्ट्रिक करंट लावल्याने झाली आहे असेच दिसते आहे तरीही विज वितरण चे अधिकारी या बाबतीत उदासीन दिसून येत आहेत परिसरातील शेतकरी आपल्या शेतीचे जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी विजेचा वापर करीत आहेत हे यावरुन दिसून येते आहे तरीसुद्धा वीजवितरण याबाबत अनभिज्ञ आहे
विज वितरण च्या गलथान कारभारामुळे विजेच्या धक्का बसून चार पशुधन दगावल्याची घटना (दि. २० मार्च) चामोर्शी तालुक्यातील रामक्रिष्णपूर शिवारात घडली. रामक्रिष्णपूर शिवारातील मनोज मिस्त्री या शेतकऱ्यांने आपल्या शेतात तारांमध्ये करंट लावला होता. शेतात या करंटला लागून गावातीलच दोन गोऱ्हे व एक गाय आणि त्याचा स्वतःचा एक गोऱ्हा अशे चार पशुंना तारेला धक्का लागताच मृत्यू झाला. आणि पुरावा नष्ट करण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून पुरुन टाकले. गावात या घटनेची कुणकुण लागताच गावातील पशुपालकास बदल्यात स्वतःची पशुधन देण्यात आले अशी खात्रीलायक माहिती आहे. शेतात विद्युत करंट लावण्याबाबत महावितरण कर्मचाऱ्यांना गांभीर्य नसल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे या घटनेत पशु दगावल्याची घटना समजताच महावितरण अधिकाऱ्यांशी व संबंधित कर्मचाऱ्यांशी फोनवर विचारणा केली असता झटका मशीनने करंट लागला असेल असे उत्तर मिळाले यावरून संबंधित शेतकऱ्याची पाठराखण करीत असल्याचे दिसून येते. वनविभागाकडून शेतकऱ्यांना शेतात वन्य प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान होऊ नये याकरिता बॅटरी वर चालणारी झटका मशीन मिळल्या आहेत पण या मशीनने एकाच वेळी चार पाच जनावर दगावल्याची घटना कधीच घडली नाही मग महावितरणचे अधिकारी व कर्मचारी म्हणतात झटका मशीनने करंट लागला असेल खरतर महावितरणला माहिती मिळाल्यानंतर ज्याठिकाणी मृत पशु पुरले ते बाहेर काढून शवविच्छेदन करायला पाहिजे होते परंतू त्यांनी तसे न करता झटका मशीनने जनावरे दगावली असे उत्तर देत आहेत
वनविभागाने दिलेले झटका मशीन वन्यप्राण्यांचा जिव घेण्यासाठी दिले काय असाही प्रश्न उपस्थित होतो आहे. संबंधित शेतकरी म्हणतोय झटका मशीनने करंट लागला आणि हि जनावरे दगावली याकरिता या प्रकरणाचा उलगडा करण्याकरिता विज महावितरण कंपनी विभागांनी गांभीर्याने लक्ष देऊन हि घटना नेमकी घडली कशी आणि करंट कोणता लागला याचा शोध घेण्याची गरज आहे
प्रतिक्रिया:-
रामक्रिष्णपूर येथे कोणत्याही पशुला करंट लागून दगावली असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली नाही तक्रार दाखल झाल्यास याची चौकशी करण्यात येईल
पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन आष्टी