आष्टीतील प्रवासी निवाऱ्यासमोर काळी पिवळी ट्रॅक्सीचा कब्जा

0
आष्टीतील प्रवासी निवाऱ्यासमोर काळी पिवळी ट्रॅक्सीचा कब्जा 


नवीन बसस्थानक कधी होणार? त्रस्त प्रवाशांचा सवाल

आष्टी : -
 चामोर्शी तालुक्यातील आष्टीतील प्रवासी निवारा हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकालगत बऱ्याच वर्षांपासून आहे. ह्या प्रवासी निवाऱ्यासमोरच काळी पिवळी टॅक्सी चालकांनी कब्जा केल्याचे दिसून येत आहे 
हे टॅक्सी चालक गोंडपिपरी,बल्हारशाह, चंद्रपूर असे मोठ्या जोरजोराने ओरडत असतात व याच चौकातून सुरजागड लोहखनिजाच्या कच्च्या मालाची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबत लोकप्रतिनिधींसह महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही त्याचे सोयरसुतक असल्याचे दिसत नाही नवीन बसस्थानक कधी होईल हा प्रश्न त्रस्त प्रवाशांकडून विचारला जात आहे.

आष्टी शहराला चंद्रपूर, गडचिरोली,आलापल्ली,जोडणारे व ईल्लूर येथील पेपरमील व आता नव्याने आष्टी शहराजवळील १० कि.मी. अंतरावर कोनसरी येथे लॉयड्स मेटल ॲड एनर्जी लिमिटेड कंपनीचा लोह प्रकल्प सुरू झाल्याने जिल्ह्यातील मध्यवर्ती केंद्र म्हणून आष्टीची ओळख आहे. त्यामुळे आष्टी येथील प्रवासी निवारा परिसरात प्रवाशांची सतत मोठी गर्दी असते. जिल्ह्यात गडचिरोली, अहेरी असे दोन बसस्थानक आहेत या आगारातून दिवसभरात चामोर्शी, मुलचेरा, चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील गावांसह या बसस्थानकांतून शालेय विद्यार्थी व महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसह जवळपास शेकडो प्रवासी प्रवास करतात परंतू येथील प्रवासी निवारा महामार्गाला लागूनच असल्याने प्रवाशांना त्रास सोसावा लागत आहे
या प्रवासी निवारा परिसरात पाहिजे तेवढी बसण्यासाठी सोय उपलब्ध नसल्याने अनेकांना ऊन, वारा, पावसात भिजत उभे राहावे लागते. तसेच आगारतून आलेली बस काळी पिवळी टॅक्सी बसस्टॉप वरच उभे राहत असल्याने बस जेथे मोकळी जागा उपलब्ध असेल तेथे उभी राहत असल्याने ती बस नेमकी कोठे जाणार, याची माहिती नसल्याने प्रवाशांचा मोठा गोंधळ उडतो.अनेकदा त्यांच्या बसेस चुकतात. त्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवतात. शाळा सुटल्यानंतर बसस्थानकाला अक्षरशः यात्रेचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसते. ग्रामीण भागातील मुलांना गावी जाण्यासाठी कमी बस उपलब्ध असल्याने त्यांना धावतपळत जाऊन बस पकडावी लागते. त्यामुळे अनेकदा अपघात घडले आहेत अश्या प्रकारे प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे याबाबत संबंधितांनी लक्ष घालून कोणत्याही परिस्थितीत नवीन दुसऱ्या उपलब्ध असलेल्या ठिकाणी बसस्थानक उभारण्यात यावे व प्रवाशांची गैरसोय दूर व्हावी, अशी मागणी त्रस्त प्रवाशांतून होत आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !