केंद्र सरकारने वाहन चालकांच्या विरोधात केलेले कायदे रद्द करा निवेदनातून केली मागणी या रयत

0
केंद्र सरकारने वाहन चालकांच्या विरोधात केलेले कायदे रद्द करा निवेदनातून केली मागणी


अरुण रामुजी भोले
नागभीड तालुका प्रतिनिधी

नागभीड:-
तालुका काँग्रेस कमेटी नागभीड व तालुका वाहन चालक संघटना च्या वतीने
 दिनांक १ जानेवारी २०२४ ला केंद्र सरकारने घेतलेले नवीन विधेयक नुसार अपघातातील वाहन चालक वाहन सोडून पळून गेल्यास वाहन चालकास ७ लाख रु. दंड व १० वर्षाची शिक्षा नवीन कायद्यात केलेली आहे.कधी कधी वाहन चालकाची चुकी नसतानाही वाहन पेटवणे,ड्रायव्हरला मारहाण करणे, अशा अनेक घटना घडत असतात. तरी साधारण कुटुंबातील ड्रायव्हरला ७ लाख रू. दंड तसेच दहा वर्षाची शिक्षा परवडणारे नाही. तरी या कायद्यात दुरुस्ती करून याबाबत दिनांक ५/०१/२०२४ पर्यंत ठोस निर्णय घ्यावे. अन्यथा व ६/०१/२०२४ पासून ड्रायव्हर संघटना आंदोलन करण्याचे ठरविण्यात येईल. याला सर्वशी जबाबदारी प्रशासनाची राहील.
 अशा प्रकारचे निवेदन नागभीड तालुका काँग्रेस व नागभीड तालुका ड्रायव्हर संघटनेच्या वतीने देण्यात आले.
      यावेळी नागभीड तालुका कांग्रेस अध्यक्ष प्रमोदजी चौधरी,चिमूर विधानसभा काँग्रेस संयोजक विनोदभाऊ बोरकर, नागभीड शहर कांग्रेस अध्यक्ष किशोरभाऊ समर्थ, युवक कांग्रेस शहर अध्यक्ष महेश कुरझॅकर, शत्रुघ्न देवाडे, संदीप करुटकर, संदीप देवाडे, विजय भोयर,संजय अलोणे,कपिल चौधरी,सलमान शेख,प्रदीप वाघमारे,रवी देवाडे,तसेच नागभीड तालुका ड्रायव्हर संघटना उपस्थित होती.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !