शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी तहशील कार्यालयावर धडक
अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचे नायब तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
आरमोरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे व विविध नदी नाल्याच्या महापुरामुळे शेत पिक पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहेत तसेच ऐन धान पिक कापणीच्या वेळी तुडतुडा रोगाने आक्रमण केल्यानेच धानपीक नष्ठ झाले आहेत व धानाची तनिस होऊन शेतकरी वारंवार अडचणीत सापडला आहे पहीलेच दरवर्षी येणारे विविध आजार पुर यामुळे आपलीं परस्थिती सावरण्यासाठी विविध बॅकाकडुन पिक कर्ज घेतले मात्र वारंवार शेतकऱ्याचे नुकसान झाल्याने बॅंकांचे कर्ज भरणे अवघड असताना बॅंकांनी शेतकऱ्यांच्या घरी कर्ज वसुलीसाठी तगाताच लावल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे पहिलेच अतिवृष्टीमुळे मुळे नुकसान झालीं आता तुडतुडा रोगाने पुर्णता धानच पिक गेले असताना नुकसान ग्रस्त यादित नाव नसल्यामुळे खऱ्यां नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासुन वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात यावी व संपूर्ण पिक कर्ज माफ करण्यात यावे यासाठी आरमोरी तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे गडचिरोली अदिवासी कांग्रेसचे जिल्हा सचिव दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात अन्याय ग्रस्त वासाळा वनखी चामोर्शी यासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहशिल कार्यालयाला धडक देऊन निवेदन देऊन नायब तहसिलदार दोनाडकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कडे निवेदनातून मागणी केली आहे.
यावेळी युवक काँग्रेसचे महासचिव निलेश अंबादे काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजकुमार नंदरधने तालुका युवक काँग्रेस महासचिव भैय्या खडारकर कान्हुजी मेश्राम हिरालाल कोल्हेकर मुखरु मेश्राम श्रावण म्हशाखेत्री टिकाराम मेश्राम भाष्कर आलबनकर ज्ञानेश्वर मेश्राम सुरेश शिलोरे ईश्वर धकाते देविदास मशाखेत्री किशोर रामटेके अमोल मेश्राम शंकर बावने भाऊराव रामटेके सुरेश नेवारे रामचंद्र राऊत डंबाजी गोहणे विजय ईनकने वामन रामटेके देवदास मेश्राम लहु सेलोटे केवळराम वहाडे धनपाल राऊत अभिषेक नेवारे पुषोतम बारसागडे गिरीधर वाढनकर माधव रोहनकर खुशाल जराते बाबुराव भोयर रामदास जराते जनार्दन मेश्राम भाष्कर गोहणे रामदेव दुमाने लालाजी मगरे ईश्वर बावणे टिकाराम गजभिये निलकंठ ऊईके यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.