भारत जोडो अभियानाच्या जनजागरणासाठी देसाईगंज ते आरमोरी बाईक रैली
जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष लारेन्स गेडाम यांचे आवाहन
अशोक खंडारे संपादक
वैनगंगा वार्ता
आरमोरी - राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारी ते जम्मु काश्मीर भारत जोडो पद यात्रा सुरू केली असून हि यात्रा महाराष्ट्रात दि ७ नोहेब्हर ला नांदेड जिल्ह्यात पोहचत आहे या यात्रेचा जनतेमध्ये प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने दिनांक दि ३० आक्टोबरला दु १२:३० देसाईगंज समथ ग्रस एजशी पासुन येथुन आरमोरी शहरा पर्यंत मोटार सायकल रैलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर रैली मध्ये सर्व युवक काँग्रेस . काँग्रेस ओबिसी सेल .महिला काँग्रेस .एनयुआय सहकार . रोजगार स्वयंरोजगार अनुसूचित जाती सेल पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष लारेन्स गेडाम यांनी केले.

