सामाजिक कार्यकर्ते कपील पाल यांची संजय गांधी निराधार योजना समितीत निवड
आष्टी (अशोक खंडारे):- आष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य कपील पाल यांची संजय गांधी निराधार योजना तालुका चामोर्शी समीतीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे
त्यामुळे आष्टी परिसरातील निराधार गोरगरीब, दिनदुबळ्या नागरिकांना योजनेचा लाभ घेण्यासाठी सोईस्कर होणार आहे
त्यांच्या निवडीबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, राजू येडलावार, अंतू तांगडे, अमोल पंदिलवार, मंगेश पोरटे, अशोक खंडारे, संतोष बारापात्रे, छोटू दुर्गे, आशिष क्षिरसागर, देवा लोनगाडगे, अमित कुकुडकर, देवा ठाकुर, गुड्डू आचेवार, संतोष नागरगोजे आदिंसह आष्टी परिसरातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे. गोरगरीब दिनदुबळ्या निराधार नागरिकांना योजनेचा पुरेपूर लाभ मिळवून देण्यासाठी मी सदैव तत्पर राहणार असे नवनियुक्त सदस्य कपील पाल यांनी मत व्यक्त केले आहे

