मला मायबाप मतदारांनी खासदार म्हणून निवडून दिले तर प्रत्येक गावात बार व दारुचे दुकानाचे बेरोजगारांना परवाने देणार
चंद्रपूर:-
मला जर मायबाप मतदारांनी खासदार म्हणून निवडून दिले तर प्रत्येक गावात बार व दारुचे दुकानांचे परवाने बेरोजगारांना देणार असे एका महिला उमेदवारांनी घोषित केले आहे झाले खासदार तर गाव तिथे बार! आनंदाच्या शिध्यात बिअरची धार; झिंगाट आश्वासनं देणारी उमेदवार निवडणूक प्रचारात उमेदवार मतदारांवर आश्वासनांची बरसात करतात. चंद्रपुराच्या एका महिला उमेदवारानं मतदारांना एकापेक्षा एक भन्नाट आश्वासनं दिली आहेत. त्यांची सध्या चर्चा जोरात सुरू आहे
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. राजकीय पक्षांकडून, उमेदवारांकडून मतदारांवर अक्षरशः आश्वासनाचा पाऊस पाडला जात आहे. हे करू की. ते करू हे सांगताना नेते थकताना दिसत नाहीत. अशात लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या एका महिला उमेदवाराने दिलेल्या आश्वासनाने तळीरामांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे
खासदार झाले तर गाव तिथे बिअर बार उघडू. बेरोजगारांना बिअर बारचे परवाने देऊ असे आश्वासन दिले आहे. त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत. तर दारिद्र्यरेषेखाली असणाऱ्याना आनंदाच्या शिध्यामध्ये व्हिस्की, बिअर देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. वनिता जितेंद्र राऊत असे महिला उमेदवाराचे नाव असून. त्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेच्या उमेदवार आहेत
चंद्रपूर -वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात एकूण पंधरा उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यात काँग्रेस, भाजप, वंचित अशा प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे. मात्र सध्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघात चर्चा आहे ती अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता जितेंद्र राऊत यांची. विकासकामांची आश्वासने घेऊन नेते जनतेत जातात. पण याला वनिता राऊत अपवाद ठरल्या आहेत.
गाव तिथे बिअर बार उघडू. बेरोजगारांना बिअर बारचे परवाने देऊ, अशी आश्वासने त्या देत आहेत. खासदार झाले तर खासदार निधीतून दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्यांना आनंदाच्या शिध्यामध्ये व्हिस्की, बिअर देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यांनी दिलेल्या आश्वासनाकडे मतदार किती आकर्षित होतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. वनिता राऊत ह्या सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी गावच्या रहिवासी आहेत.
वनिता राऊत यांनी यापूर्वी नागपूर येथून २०१९ ची लोकसभा, २०१९ मध्ये चिमूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. दोन्ही वेळा त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यावेळी जिल्ह्यात दारुबंदी होती. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातून दारुबंदी उठवून ठिकठिकाणी दारूची दुकाने उघडण्यात यावी अशी मागणी केली होती. गाव तिथे दारूचे दुकान असे धोरण त्यांचे आहे. समाजाला दारू पिण्यापासून वंचित ठेवणे ही फार मोठी चूक असल्याचे त्या म्हणतात.