गरजे एवढेच पाणी वापरा -डॉ. पि .के. सिंग

0
गरजे एवढेच पाणी वापरा -डॉ. पि .के. सिंग 


आष्टी:-
 पाण्याचे वेळीच उपाययोजना न केल्यास भविष्यात भीषण आणि कठीण परिणामांना सामोरे जावे लागेल, स्वतःला नेमके किती पाण्याची गरज आहे हे ओळखून गरजे एवढेच पाणी वापरा असे विचार राष्ट्रीय जल दिनानिमित्त डॉ. पी के सिंग यांनी अध्यक्षीय भाषणातून मांडले. 
   आष्टी येथील स्थानिक श्री सद्गुरु साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे 22 मार्च 2024 ला राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राष्ट्रीय जल दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले. डॉ.प्रकाश राठोड यांनी आपल्या प्रास्ताविकेतून पाणी टंचाई मुळे निर्माण झालेल्या मनुष्यनिर्मित संकटांना रोखण्यासाठी युवा पिढींना सामोरे यावे लागेल असे विचार व्यक्त केले.  डॉ. अपर्णा मार्गोनवार यांनी पाण्याला प्रदूषणापासून कसे रोखता येईल, पाणी स्वच्छता व पाणी संवर्धन यावरील उपाय योजना आपल्या मार्गदर्शनातून स्पष्ट केले. बी. एस्सी. द्वितीय वर्षातील विद्यार्थी नयन रामगोनवार याने रेन वॉटर हार्वेस्टिंग चे महत्व पावर पॉइंट सादरीकरणाच्या माध्यमातून पटवून दिले. विचार मंचावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी के सिंग,डॉ. अपर्णा मारगोनवार, डॉ. एम पी सिंग, डॉ. दीपक नागापुरे, डॉ. प्रकाश राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. सुबोध साखरे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रदीप कश्यप, डॉ.सोनाली धवस, प्रा. जया रोकडे, प्रा. सचिन मुरकुटे, प्रा. कवींद्र साखरे, अविनाश जीवतोडे, विजू खोब्रागडे, सविता गारघाटे, शुभांगी डोंगरे, रवींद्र झाडे, संदीप मानापुरे, उषा माहूरपवार, रमेश वागदरकर, पोर्णिमा गोहणे आदींनी सहकार्य केले. यावेळी महाविद्यालयीन प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !