मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव येथील गाजलेल्या जातीवाचक शिवीगाळीच्या खोट्या प्रकरणाला जिल्हा न्यायालयाची चपराक.
मंगळवेढा प्रतिनिधी, दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी डोंगरगावच्या ग्रामसभेमध्ये काही राजकीय विरोधक समाज कंटकांनी प्रचंड गोंधळ व कालवा करून सभा बंद पाडून केलेल्या गुन्ह्याचे प्रकरण दाबण्यासाठी त्याचे रूपांतर डोंगरगाव च्या लोकनियुक्त सरपंचा याच्या पति सह नऊ प्रतिष्ठित लोकांवर दाखल झालेली खोटे जातीवाचक शिवीगाळ प्रकरण मा. जिल्हा न्यायाधीश पंढरपूर श्री लंबे यांनी ता. 22/02/2024 रोजी खारीज केले. यामुळे भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री विवेकानंद खिलारे, यांचे सह नऊ प्रतिष्ठित लोकांना डिस्चार्ज करण्यात आले.
याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की,
26 जानेवारी 2023 रोजी च्या ग्रामसभेच्या मीटिंगमध्ये सत्ताधारी पक्षाचे राजकीय विरोधक असलेल्या ग्रामस्थांनी चालू सभा बंद पाडून त्यात कालवा गोंधळ करून दलित समाज बांधवांवर अन्याय करून त्याला मारहाण केली होती, तसेंच जातीवाचक शिवीगाळ केली तसेच महिलांचा विनयभंग ही त्या लोकांनी केला होता. डोंगरगावच्या सभेमध्ये झालेल्या त्या प्रकरणा विरुद्ध संबंधित गावातील पीडित बांधवांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम आणि भारतीय दंड विधानांचे कायदे तरतूदी अनुसार रीतसर फिर्याद दिली होती. त्या राजकीय विरोधकां विरुद्धचे सदरचे प्रकरण सरपंच यांनी मध्यस्थी करून दाबून टाकावे आणि पीडित बांधवांवर अन्याय होऊ द्यावा यासाठी विद्यमान सरपंचाचे पती यांना त्यांचे राजकीय विरोधकांनी दबाव तंत्राचा वापर करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले होते.
सरपंचांचे विरोधक यांनी तारीख 4 मार्च 2023 रोजी विद्यमान सरपंचांचे पती तसेच भाजपा ओबीसी मोर्चाचेे विद्यमान जिल्हाध्यक्ष असलेल्या विवेकानंद तुकाराम खिलारे, यांच्या सह दादासाहेब तुकाराम खिलारे, निसार रमजान पठाण, अमोल शंकर मेटकरी, अशोक पांडुरंग जाधव, लक्ष्मण उर्फ शरद महादेव हेंबाडे, उत्तम लक्ष्मण सावत, बाबासो अंबिर सय्यद, विशाल ज्ञानेश्वर जाधव, भीमराव बाबू लटके, प्रदीप मनोहर चौगुले या समाजसेवक प्रतिष्ठित लोकांवर गुन्हा दाखल केला होता.
सदरचे खोटे प्रकरण दाखल झाल्यामुळे जिल्हाध्यक्ष विवेकानंद खिलारे आणि इतर पीडित यांनी मा. जिल्हा न्यायालय पंढरपूर येथे अटकपूर्व जामीन अर्ज केला. त्या प्रकरणात जिल्हाध्यक्ष खिलारे यांनी अनेक कागदोपत्री पुरावे, विरोधकां विरुद्ध दिलेल्या लेखी तक्रारी, मूळ फिर्यादी ही पूर्वीच्या केस मधील राजकीय विरोधक असलेल्या आरोपीची पत्नी आहे आणि तिने मुद्दाम राजकीय स्वार्थ हेतूने खोटी फिर्याद दाखल केलेली आहे. तसेच त्या खोटारड्या फिर्यादी महिलेने कोणताही आरोपी गावात नसताना त्यांच्यावर खोटी केस दाखल केली आहे, तसेच घटना घडते त्यादिवशी त्यावेळी आरोपी हे सरकारी अधिकारी यांना सोबत घेऊन गाव विकासासाठी योजना आखत होते हे पुराव्यानिशी दाखवून दिले होते. तसेच एक खरी घडलेली गुन्हेगारीची घटना दाबण्यासाठी राजकीय विरोधकांनी दाखल केलेल्या अनेक खोट्या फिर्यादी यांच्या कागदोपत्री पुराव्यासह स्वतःच निष्पापत्त्व सिद्ध केले होते.
मा. जिल्हा न्यायाधीश यांनी तांत्रिक कारणाने सदर जामिनाचे प्रकरण खारीज केले होते. त्या विरुद्ध दाद मागण्यासाठी जिल्हाध्यक्ष विवेकानंद खिलारे यांना मा. उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागला होता. त्या प्रकरणात ही मंगळवेढा पोलिसांनी घेतलेली बघ्यांची भूमिका हे सर्व संशयाच्या फेऱ्यात येत होते. मंगळवेढा पोलिसांनी योग्य वेळी योग्य ती दखल घेतली असती तर पीडित लोकांवर अन्याय झाला नसता या व अशा अनेक कारणास्तव जिल्हाध्यक्ष विवेकानंद खिलारे यांनी संबंधित पोलिसां विरुद्ध सुद्धा लेखी तक्रारी वरिष्ठ अधिकारी यांना दिल्या अखेर कागदोपत्री पुराव्यांच्या आधारावर मंगळवेढा पोलिसांनी खरा व वस्तुनिष्ठ अहवाल देत मूळ फिर्यादीने खोटेपणाने फिर्याद दिल्या बाबत कबूल करून 'ब' समरी अहवाल मा. कोर्टात दाखल केला.
सदरचा अहवाल पाहून मा. जिल्हा न्यायाधीश पंढरपूर यांनी या प्रकरणात मा. उच्च न्यायालयाचे आदेशाचा मान राखत पीडित आरोपींचा जामीन मंजूर केला तसेच खोटारड्या मूळ फिर्यादीला नोटीस काढून त्या मध्ये म्हणणे मागवण्याचे आदेश केले.
सदर प्रकरणात नोटीस बजावून सुद्धा मूळ फिर्यादी चौकशीला हजर राहिली नाही, तिने कोणतेही म्हणणे त्या प्रकरणात दिले नाही या कारणाने मा. जिल्हा न्यायाधीश पंढरपूर यांनी आरोपीता विरुद्ध चे सदरचे खोटे जातीवाचक शिवीगाळ प्रकरण कायमचे बंद करून आरोपींना त्या प्रकरणातून डिस्चार्ज केले.
जिल्हाध्यक्ष विवेकानंद खिलारे यांचे सह सर्व आरोपीत या प्रकरणाचे मधून निर्विवादपणे मुक्त करण्यात आले आहे.
यामुळे राजकीय लोभातून खोट्या केसेस दाखल करणाऱ्या खोटारड्या मूळ फिर्यादी हिला आणि तिचे पाठीमागे असणाऱ्या राजकीय पुढार्यांना मोठी चपराक नयायालयाने मारली आहे.डोंगरगावच्या सदर प्रकरणाला हायकोर्टातील निवाड्यांचे विधीज्ञांच्या अभ्यासात वापरले जाणारे रिपोर्टिंगचे पुस्तकांमध्ये सुद्धा स्थान मिळाले आहे.
या प्रकरणात भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विवेकानंद खिलारे आणि इतर प्रतिष्ठित लोक यांचे वतीने भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव ॲड. सुहास अरुणशेठ माळवे, ॲड.दीपक कारंडे, ॲड. आनंद मोरे, ॲड. सचिनकुमार राजेपांढरे यांनी काम पाहिले. तर सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. सारंग वांगीकर यांनी काम पाहिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष विवेकानंद खिलारे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी संवाद साधला की, आमचा न्यायालयावर आणि न्याय व्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे. ओपन समाजातील लोकांनी राजकीय हेतूने ओबीसी समाजातील लोकांना टार्गेट करून अन्याय करण्याचा प्रयत्न केला, अनेक वर्षांची विरोधकांची राजकीय सत्ता सुजाण नागरिकांनी उलथून लावल्या नंतर तो पराभव पचणी पडला नाही, जनमताचा अपमान करण्याचा हा प्रकार समाजात घातक व गंभीर आहे याकरिता दोन विविध जातींमध्ये तेड पसरवून खोट्या जातीवाचक शिवीगाळी चे प्रकरण दाखल करणे हे म्हणजे अपरिपक्व राजकीय विचारसरणीचे लक्षण आहे. अशा समाज कंटकांच्या वृत्तींना वेळीच आळा घातला गेला पाहिजे. विकासाची खरी व योग्य दिशा आखली गेली पाहिजे. विकास कागदावर नाही तर तो प्रत्यक्षात उतरला पाहिजे आणि ते जो काम करीत असेल त्याला सहकार्य करणे जमत नसेल तर विरोध करणे ही लाजिरवाणी बाब आहे. आम्ही असल्या वृत्तीचा विरोध करतो आणि निषेध व्यक्त करतो. आम्हाला कितीही अडवले तरी आम्ही गावाचा कायापालट व विकास केल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री त्यांनी दिली. शिवाय आमच्या विरुद्ध खोट्या केसेस दाखल करणाऱ्या खोटारड्या मूळ फिर्यादी विरुद्ध आणि त्यांचे सहकारी यांच्या विरुद्ध आम्ही बदनामीचा आणि अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली.
मुलाखतीचा शेवट त्यांनी सत्यमेव जयते या वाक्याने केला.