थंडीत रस्त्यावर ताटकळत असलेल्या विद्यार्थ्यांना बसची केली व्यवस्था
राजे अम्ब्रेशराव आत्राम यांनी दिला संवेदनशील तेचा परिचय
क्रिष्णा गावडे तालुका प्रतिनिधी
थंडीत रस्त्यावर ताटकळत असलेल्या विद्यार्थ्यांना बसची सोय करुन त्यांना रवाना होईपर्यंत माजी पालकमंत्री राजे अम्ब्रेशराव आत्राम हे जातिने आलापल्ली बस थांब्यावर थांबले.
एटापली येथून काल कार्यक्रम आटपून परत येताना माजी पालकमंत्री मा. राजे अब्रेशराव आत्राम अहेरी कडे परत येताना अल्लापल्ली बस स्थानक जवळ अनेक विद्यार्थी बस येण्याची वाट बघत असल्याचे राजेंना लक्षात आले राजे साहेबांनी स्वतः गाडी थांबवून विद्यार्थ्यांची आस्थेने विचारपूस केली तेव्हा गेल्या 3 तासापासून थंडीत हे विद्यार्थी बस साठी वाट बघत असल्याचे राजे साहेबांना विद्यार्थीनी सांगितले आणि संवेदनशील मनाच्या राजे साहेबांनी अहेरी आगाराचे व्यवस्थापक (DM) युवराज राठोड यांना स्वतः फोन लावून चांगलीच तांबी दिली विद्यार्थ्यांसाठी बस तात्काळ अल्लापल्ली साठी सोडवण्याची सूचना त्यांना केली काही वेळातच बस आली आणि राजे साहेबांनी स्वतः सर्व विद्यार्थ्यांना केळी आणि पाणी देत सर्व विद्यार्थी बस मध्ये चढत पर्यंत स्वतः तिथे थांबले बस रवाना होताच राजे साहेब अहेरी साठी निघाले अशा संवेदनशील आणि दिलदार मनाच्या राजाला खरोखरच मानाचा मुजरा