गोंदिया:-
जिल्ह्यातील दासगाव बुज येथील शासकीय जागेवर अतिक्रमण करून समाजाचे झेंडे लावल्याप्रकरणी रावणवाडी पोलिस ठाण्यात ५७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोंदिया तालुक्यातील दासगाव बु. गेल्या काही वर्षात ग्रामपंचायती हुतात्मा बिरसा मुंडा यांचा पुतळा बसविण्याच्या उद्देशाने वर्षानुवर्षे मोकळ्या पडलेल्या शासकीय जमिनीवर आदिवासी समाजातर्फे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायतीने शासकीय जागेवरून ध्वज हटविण्याचा आग्रह धरला. मात्र आदिवासी समाजातील सदस्यांनी ध्वज न हटवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ध्वज हटविण्यावरून ग्रामपंचायत व आदिवासी समाजात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामपंचायत प्रशासनाने रावणवाडीचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम आहेरकर, तहसीलदार वाळके, नायब तहसीलदार तिवारी, मंडल अधिकारी प्रकाश वंजारी, पटवारी सेटे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून या प्रकरणाचा तपास करण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्याचीविनंती केली.
अधिकारी घटनास्थळी
पोहोचल्यानंतर सरपंच राणू तुरकर,
उपसरपंच रेखा बिसेन, सचिव
रहांगडाले, ग्रामपंचायत सदस्य राजेश
चावरे, प्रकाश नेवरे, कन्नीलाल सोनवणे घटनास्थळी पोहोचले, ग्रामपंचायत प्रशासनाने आदिवासी समाज बांधवांची ग्रामपंचायतीमध्ये बैठक घेतली शासकीय अधिकारी व
कर्मचाऱ्यांनी आदिवासी समाजातील
सदस्यांना समजावून सांगण्याचा
आटोकाट प्रयत्न करून शासकीय
जमिनीवरील ध्वज हटविला. पण तेथून
ध्वज न हटवण्याचा निर्णय त्यांनी
बदलला नाही. ध्वज तिथेच राहणार
असून लवकरच बिरसा मुंडा आणि वीर नारायण सिंह यांचे पुतळे तिथे बसवलेजातील, असे त्यांनी सांगितले. यावेळीविदर्भ आदिवासी समितीचे अध्यक्षअरुण सोनवणे, सचिव रामप्रसादमेश्राम, कोषाध्यक्ष सागर पंधरवार,सुकालू सोनवणे, दीपक मेश्राम, राजूमेश्राम, सकुंतला मेश्राम, मधु बागडे,सुनीता बागडे, मंजूमेश्राम, जितेंद्र मेश्राम उपस्थित होते

