राष्ट्रीय गोरक्षक संघ किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष हकीम शेख अब्दुल सत्तार यांची चौकशीची मागणी
नागेश इटेकर,प्रतिनिधी
गोडपिपरी ::-
तहसीलच्या तोहोगाव येथे जंगलाला लागून असलेल्या जागेत विनापरवाना गोवंश निवारा सुरू करण्यात आला आहे. या गोशाळेतील गुरांची अवस्था दयनीय झाली असून, त्यांची अवस्था पाहता गोशाळेच्या नावाखाली गोरखधंदा सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच राष्ट्रीय गोरक्षक संघ किसान सभेचे हकीम शेख अब्दुल सत्तार यांनी सदर गोधन आश्रयस्थानाची चौकशी करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गत वर्षांपूर्वी कोठारी येथे मध्यंतरी परवानगी न घेता हा गोधन आश्रयस्थान उभारण्यात आले होते. निवासी वसाहतीतील ग्रामस्थांनी याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार केली असता कारवाईच्या भीतीने गोरक्षकांनी घाईघाईने तोहोगाव गाठले.गोशाळेच्या नावाखाली चालणाऱ्या त्यांच्या गोरखधंद्याची संपूर्ण तहसीलमध्ये चांगलीच चर्चा आहे.समाजसेवेच्या नावाखाली गोशालयाची कोणतीही अधिकृत परवाना नसताना खासगी गोशाळा सुरू करून त्या माध्यमातून जनावरे विक्रीचा धंदा केला जात आहे.
गोशाळेत सुमारे दीडशे जनावरे आहेत मात्र त्यांच्या चारा, पाणी, संरक्षण व आरोग्याची योग्य काळजी घेतली जात नाही.अवैध मार्गाने कत्तली करिता नेत असणाऱ्या जनावरांना पकळून तस्करांवर मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात आल्या. सण २०१० ते २०२३ पर्यंत तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागात तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील मुल, पोंभूर्णा, तोहोगाव फाटा,गडचिरोली जिल्ह्यातील कारवाफा,अशा अनेक ठिकाणी धाड टाकून मोठ्या संख्येने गुरे पकडल्या गेले.परंतु आज घडीला बोटावर मोजण्याइतकेच गोशालयात जनावरे आहेत.इतक्या वर्षापासून जप्त करण्यात आलेली गुरे अखेर गेली कोठे? याची चौकशी व्हायला पाहिजे. मोकळ्या आकाशाखाली गुरांना ठेवण्यात आले आहे. पावसामुळे गुरे ठेवलेल्या ठिकाणी चिखलाचा सडा पडलेला आहे. याठिकाणी जनावरे कशी बसू शकत असतील हे गोठ्याचे मालकच सांगू शकतील.सामाजिक सेवेच्या नावाखाली गोठ्यामालकांची परवानगी असेल, तर कोठारीत तक्रार केल्यावर त्यांनी गोडपिपरी आणि तोहोगावला का पळून गेले ? असा सवाल करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय गोरक्षक संघ किसान सभेकडून करण्यात आली आहे.