धरणाच्या पाण्यात आंघोळीसाठी गेलेल्या नऊ मुली बुडाल्या , सात जणींना वाचवण्यात यश, दोन मुलींचा मृत्यू

0
धरणाच्या पाण्यात आंघोळीसाठी गेलेल्या नऊ मुली बुडाल्या ,
सात जणींना वाचवण्यात यश, दोन मुलींचा मृत्यू



अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता 

पुणे:- 
खडकवासला धरण परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या नऊ मुली बुडाल्या आहेत. या नऊ मुलींपैकी सात मुलींना बाहेर काढण्यात यश आले आहे. परंतु दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. गोहे खुर्द तालुका हवेली गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे. जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी त्यापैकी सात मुलींना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले तर दोन मुली अद्याप सापडल्या नाहीत. हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पीएमआरडीएचे अग्निशमन दलाचे जवान दाखल होत आहेत.
खुशी संजय खुर्द (वय 14 वर्ष), शीतल भगवान टिटोरे ( वय 15 वर्ष) या दोन्ही मुलींचा मृत्यू झाला आहे. पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या या सगळ्या मुली बुलढाणा जिल्ह्यातील असून पुण्यातील गोरे खुर्द गावात त्यांच्या नातेवाईकाकडे बारशाचा कार्यक्रमाला आल्या होत्या. या दोघींच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !