देसाईगंज :-
देसाईगंज तालुक्यातिल विविध समस्यांमुळे सर्वसामान्य जनतेला मुलभुत सोयी सुविधांपासुन वंचित रहावे लागते प्रशासकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणन्यासाठी योजना कार्यान्वित करुन वैयक्तिक व कौटुंबिक लाभ मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश शासनस्तरावरुन नेहमीच दिले जाते. मात्र लाल फितशाही व दप्तर दिरंगाईमुळे अनेक जण योजनेच्या लाभापासुन वंचित राहात असल्याचे चित्र संपुर्ण देसाईगंज तालुक्यात पहावयास मिळत आहे, ही बाब लक्षात घेवुन कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जि. प. सदस्य नंदु नरोटे, युवा नेता पिंकू बावणे, युवक तालुकाध्यक्ष पंकज चहांदे यांच्या नेतृत्वात देसाईगंजच्या उपविभागिय अधिकारी यांच्या कार्यालयावर आज धडक मोर्चा उभारला या प्रसंगी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, जिल्हा काँग्रेस चे उपाध्यक्ष दिलीप घोडाम उपाध्यक्ष नितिन राऊत, हरिष मोटवानी, मनोहर निमजे, अरुण कुंभलवार, रुपलता बोदेले, पुष्पा कोहपरे, जगदिश शेंन्द्रे, विजय पिल्लेवान, राजकुमार मेश्राम, विलास बन्सोड, राजु राऊत, पवन गेडाम, टारजन खोब्रागडे, नरेश लिंगायत यांचेसह शेकडो मोर्चेकरी उपस्थित होते.
मोर्चेकऱ्यांचे निवेदन सादर करतांना नंदु नरोटे म्हणाले की, देसाईगंज नगर परिषदेच्या कक्षेत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांनी अनेकवेळा निवाऱ्याचे साधन उपलब्ध होण्यासाठी अनेकवेळा घरकुलासाठी सर्व कागदपञांची पुर्तता करुन अर्ज सादर केले. मात्र कार्यालयीन लालफितशाही व दप्तर दिरंगाईमुळे जाचक अटी पुढे करुन शहरातील शेकडो लाभार्थी योजनेच्या लाभापासुन वंचित राहिले, देसाईगंज नगर परिषदेने पाच वर्षापुर्वी २ कोटी ४७ लाख रुपयाचा महसुल सिटीसर्वेसाठी भरला असुन आजतागायत सिटी सर्व्हेचे काम पुर्ण झाले नाही, आखिव पञिकांची पुर्तता भुमिअभिलेख कार्यालयाने केले नसल्याने सर्वसामान्य लाभार्थ्यांना निवाऱ्याचे साधन उपलब्ध होऊ शकले नाही, एवढेच नव्हे तर रेल्वे भुमिगत पुलाचा प्रश्न अजुनही सुटलेला नाही, शहरातिल अनेक ओपनस्पेस गिळंकृत करण्यात आली. यावर शासन स्तरावर चौकशी करण्यात यावी पुरग्रस्त भागात अवैद्य लेआऊट उभारुण प्लॉटची राजरोसपणे विक्री करुण पुरग्रस्त भागात पक्या घरांचे बांधकाम करण्यात येत असल्याने शासनाचा महसुल बुडविण्याचा प्रयत्न अवैद्य लेआऊट धारकांकडुन होत आहे.
देसाईगंज शहर ही जिल्ह्यातिल व्यापारपेठ असुन या ठिकाणी आवागमनाची नेहमीच वर्दळ असते त्यामुळे अपघाताचे प्रमाण ही मोठ्या प्रमाणात वाढले असुन मुख्य चौकात सिसिटिव्ही कैमेरे लावण्यात यावे, यासाठी वारंवार निवेदने देवुनही मागणीची पुर्तता करण्यात आली नाही, तलाव बोड्यांतील अतिक्रमणे हटवुन खोलिकरणाच्या माध्यमातुन जलसाठा वाढवून कृषी सिंचनाला मदत करावी शहरातिल मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावरिल खड्यांची डागडुजी करावी. कुरुडच्या मुख्य रस्याचे सिमेंटीकरण करावे आदिवासी व गैरआदिवासींना वनहक्काचे पट्टे बहाल करावे, रावनवाडी चा जोडरस्ता तयार करण्यात यावा, नविनलाडज या गावाला महसुली ग्रामचा दर्जा द्यावा, पुनर्वसन झालेल्या अरततोंडी ला शासकिय सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात, शेतकर्यांची ऑनलाईन नोंदणी करुन पंतप्रधान सन्मान निधी चा लाभ मिळवुन द्यावा अश्या विविध मागण्यांचे निवेदन नंदु नरोटे यांनी उपविभागिय अधिकारी जे. पी. लोंढे यांना मोर्च्या च्या माध्यमातुन सादर केले.
उपविभागिय अधिकारी यांनी न.प. मुख्यअधिकारी डॉ. कुलभुषण रामटेके, प्रभारी तहसिलदार मुनेश्वर गेडाम, पोलिस निरिक्षक किरण रासकर, सार्वजनिक बांधकाम विभाग चे अधिकारी कर्मचारी, सिंचाई विभाग चे कर्मचारी भुमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी पं. समिती चे कर्मचारी यांना निवेदन स्विकारतांना बोलावुन घेउन मोर्चेकर्यांच्या सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा करुन सर्व समस्यांचे लवकरात लवकर निराकरन करण्यासाठी शासनाकडे रितसर पाठपुरावा करावा, असे आदेश निर्गमित केले या प्रसंगी शेकडो मोर्चेकरी उपस्थित होते.