शिक्षक भरती घोटाळ्यात, आणखी किती नेत्यांनी धुतले हात?
चंद्रपूर:-
शिक्षक भरती घोटाळा झाला उघडपणे दिसून येते आहे या घोटाळ्यात अजून किती नेत्यांनी हात धुतलेले आहेत हे गुलदस्त्यातच आहे
सद्या राज्यभर गाजणाऱ्या बनावट शिक्षक भरती घोटाळ्यात नागपूर पोलिसांनी भाजप नेते दिलीप धोटे यांना अटक केली आहे. दिलीप धोटे हे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे खूप जवळचे मानले जातात. १५ लाख रुपयांना नोकऱ्या विकल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने भारतीय जनता पार्टीच्या बड्या नेत्यांच्या वतीने या प्रकरणावर सारवा सारव सुरु झाली आहे.
महत्वाचे म्हणजे हा घोटाळा स्वतः काही भाजप आमदारांनीच उघड केला आहे. त्यामुळे शिक्षण विभागात संघटित भ्रष्टाचार किती शिगेला पोहचली आहे, याची प्रचिती येते.
सरकारी शालार्थ आयडी सिस्टमचा गैरवापर करून बनावट शिक्षकांची ही भरती करण्यात आली.राज्यात सुमारे ५०० बनावट शिक्षकांची बेकायदेशीरपणे भरती करण्यात आली असल्याचा तपास यंत्रणांना संशय असून यात अटक करण्यात आलेले दिलीप धोटे यांनी प्रति व्यक्ती १५ लाख रुपये घेऊन या शिक्षकांसाठी बनावट आयडी दिल्याचे बोलल्या जात आहे. बनावट कागदपत्रांवर विठ्ठल-रुक्मिणी संस्थानात हे शिक्षक कार्यरत दाखवून त्यांना इतर शाळांमध्ये पोस्ट करण्यात आले. तपासा दरम्यान अनेक शिक्षकांनी पोलिसांसमोर लाच दिल्याची कबुली दिली आहे.
पूर्वनियोजित या शिक्षक भरती घोटाळयाने संपूर्ण महाराष्ट्र हदरवून सोडला असून याच घोटाळ्यात भंडारा जिल्ह्यातील चरण चेटुले आणि दिलीप धोटे यांना अटक करण्यात आली असून गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूर येथील शैक्षणिक संस्थांची भूमिका संशयास्पद असल्याचे तपास यंत्रणांचे मत आहे. या घोट्याळ्याचे तार राज्यातील आणखी कोणकोणत्या जिल्ह्याशी जोडले गेले आहेत हेही लवकरच स्पष्ट होणार आहे
या प्रकरणात फरार असलेले सतीश मेंढे हे नागपूर शिक्षण विभागाचे माजी उपसंचालक आहेत. सतीश मेंढे हे भाजपचे माजी खासदार सुनील मेंढे यांचे भाऊ आहेत. अटक टाळण्यासाठी ते जामीन मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती असून त्यांच्या अटके नंतर या घोटाळ्यात लिप्त अनेक चेहरे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र या घोटाळ्या मुळे शिक्षकांचा मासिक पगार तीन महिण्या पासून थांबवण्यात आल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे.भाजपने स्वतः उघड केलेल्या या घोटाळ्यात भाजपच्या काही नेत्यांची नावे पुन्हा समोर येतात का? हा प्रश्न असून, या घोटाळ्या मुळे भाजपवर राजकीय आणि नैतिक दोन्ही पातळ्यांवर प्रचंड दबाव निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. शिक्षणासारख्या संवेदनशील क्षेत्रातील हा घोटाळा राज्यातील सत्ताधारी भाजपसाठी डोकेदुखी ठरणार असून, या घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी झाल्यास आणी तपास यंत्रणांनी कोणत्याही दबावत न येता तपास केल्यास यात अनेक शिक्षणसंस्था आणी नेत्याची नावे समोर येऊ शकतात असे जाणकारांचे मत आहे.