नागपुर शहराला प्राणवायूचा पुरवठा करणारे, नागपुरातील प्रत्येकासाठी सहलीचे ठिकाण, मुलांना खेळण्याचे ठिकाण, वरिष्ट नागरिकांचे सकाळ संध्याकाळी फिरण्याचे ठिकाण म्हणून आजवर नागपूरची शान असलेले आमचे हक्काचे अंबाझरी उद्यान MTDC च्या माध्यमातून खाजगी व्यावसायिकांना विकण्याचे काम नागपुरातील प्रशासकीय अधिकारी आणि राज्यातील सरकामधील पुढाऱ्यांनी केले आहे. आमच्या हक्काचे ४४
एकर मधील भव्य असे उद्यान आता खाजगी कंपनीच्या
माध्यमातून मोठमोठ्या इमारती, रिसोर्ट, विश्रामगृह बांधून
करोडपती लोकांसाठी पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जाणार आहे.
एकूणच ४४ एकर जमीन फुकटात म्हणजे एक रुपया
वर्षाप्रमाणे ९९ वर्षांसाठी म्हणजेच ९९ रुपयात देण्याचा
कारभार महसूल विभागाने केला आहे. याबाबत आता पर्यंत
झालेले सर्व करार रद्द करावेत आणि हे उद्यान पुन्हा नागपूर
करांसाठी पूर्ववत चालू ठेवावे, सोबतच येथे असलेले डॉ
आंबेडकर भवन सुद्धा पुन्हा बांधून जनतेच्या सेवत हस्तांतरित
करावे यासाठी आज विभागीय आयुक्त बिदरी यांना आम
आदमी पार्टी च्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी
शिष्टमंडळात राज्य IT हेड आशोक मिश्रा, शहर संयोजक
कविता सिंगल, जिल्हा संगठन मंत्री प्रताप गोस्वामी, शहर
संगठन मंत्री शंकर इंगोले, राजेश गजघाटे, पूर्व विदर्भ संयोजक संजय हेडाऊ, अजय धर्म, रोशन डोंगरे, पौनीकर, डॉ अमेय नारनवरे, प्रभात अगरवाल, सोनू फटिंग, रविंद्र गीदोडे, अजिंक्य करने, जवाद अहमद, नरेश महजन, श्याम बोकडे,
पियुष आखरे, पंकज मेश्राम, गौतम कावरे, फईम अन्सारी,
कृतल आखरे, स्वप्नील सोमकुवर, दीपक भातखोरे, विजय
थकाटे, संजय बारापात्रे, आकाश वैद्य, गिरीश, इत्यादी
उपस्थित होते. यावेळी बिदरी यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
काय आहेत प्रमुख मागण्या... 1) शासन निर्णय क जमीन
-2015/प्र.क्र.299 /ज-8 दि.21.07.2017 आणि शासन निर्णय क्र. जमीन 2015/प्र.क्र.299/-8 दि.19.08.2019 रद्द करण्यात यावेत.
2) MTDC व विकासक यांच्यात झालेला करार रद्द करण्यात यावा
3) MTDC चे बेजबाबदार अधिकाऱ्यावर व त्यांच्या
विकासकांवर अवैधरित्या डॉ आंबेडकर सांस्कृतिक भवन
पाडल्याबाबत त्वरित गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी.
(4) अंबाझरी उद्यानाचा ताबा त्वरित महानगर पालिकेला परत
करुन पूर्णवेळ जनतेसाठी खुले करून द्यावे.
5) खरोखर जर या उद्यानाचा विकास करायचा असेल तर देषातील सर्वात सुंदर सार्वजनीक गार्डन म्हणजे मुगल गार्डन- दिल्ली, वृंदावन गार्डन मैसूर, बॉटनिकल गार्डन- लखनौ इत्यादी च्या धर्तिवर विकसीत करावे.