अवैध दारूविक्री बंद करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यावर मुजोर दारुविक्रेत्यांनी केला हल्ला - कार्यकर्ता गंभीर
भेदोडा गावाची राजकीय आणि सामाजिक अधःपतनाची कहाणीः 'चळवळीचं गाव' ते 'गुन्हेगारीचं अड्डा"
चंद्रपूर :-(राजुरा) अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी झटलेल्या सामाजिक कार्यकर्त्यावर मुजोर दारुविक्रेत्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केले आहे
जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील भेदोडा गाव एकेकाळी सामाजिक चळवळीसाठी ओळखलं जात होतं. परंतु गेल्या दशकभरात गावात जी सामाजिक, नैतिक आणि प्रशासकीय अधोगती सुरू झाली आहे, ती थांबण्याचं नाव घेत नाही. याचे मूळ कारण म्हणजे गावाच्या सत्ताकेंद्रात बसलेले बेईमान, भ्रष्ट आणि अवैध धंद्यांना पाठबळ देणारे राजकीय पुढारी.
एकेकाळी संघटित नागरिकांच्या आवाजाने खदखदणाऱ्या भेदोडा गावात आज गुन्हेगारी, दारू विक्री, व्यसनाधीनता, हाणामाऱ्या आणि सामाजिक असुरक्षिततेने घर केलं आहे. आणि हे सगळं होत असताना, प्रशासन शांतपणे बघ्याची भूमिका घेत आहे – किंबहुना या सर्व गैरप्रकारांना संरक्षण देण्याचं काम करत आहे.
'पोरगी देत नाहीत' - गावातील तरुणाईवर सामाजिक बहिष्कार
गावातील वाढती व्यसनाधीनता, गुन्हेगारी, चोरी, हाणामाऱ्या आणि समाजविघातक प्रकारांमुळे गावाला एक सामाजिक कलंक लागला आहे इतकंच काय, इतर गावांमधून आता भेदोडा गावात मुली देण्यास स्पष्ट नकार दिला जातो. परिणामी, गावातील तरुणांचं वैवाहिक आयुष्य उध्वस्त झालं आहे.या सामाजिक बहिष्काराचा थेट परिणाम तरुणांच्या मानसिकतेवर झाला आहे - अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळलेत, काहींनी आयुष्य संपवलं आहे, काही मृत्यूच्या दारात आहेत. त्यांच्या मागे राहिलेल्या पत्नी, लहान मुलं आणि वृद्ध पालकांचं जीवन उघड्यावर पडलं आहे.दारूबंदी लढ्यात रक्तस्राव ! कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला
गावात अवैध दारू विक्री पुन्हा सुरू होत असल्याचं लक्षात येताच सामाजिक कार्यकर्त्यांनी याविरोधात आवाज उठवला. विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांपूर्वी गावकऱ्यांनी दारूबंदी लावण्यात यश मिळवलं होतं. पण दुर्दैव म्हणजे, व्यंकटी अनमलवार, विजय अनमलवार, संजय अनमलवार आणि गणेश देबटवार यांनी स्थानिक राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा दारू विक्री सुरू केली.
याच्या विरोधात कार्यकर्ते संजय बोरुले, कल्पना सातपुते, कृष्णायांना लाठी-काठ्यांनी बेदम मारहाण केली.
संजय बोरुले यांच्या डोक्याला ७-८ टाके पडले आहेत आणि त्यांची प्रकृती गंभीर असून सध्या ते राजुरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. आणि सर्वात गंभीर बाब म्हणजे - ही घटना घडल्यानंतरही आरोपी आजतागायत फरार आहेत !
'दारूचा साठा पकडला, पण पोलीस मौन' की ढोंग? तपास चालू
त्याच रात्री अकरा वाजता पाच पेट्या देशी दारू देखील पकडण्यात आली. एवढं होऊनही पोलीस तपासात कुठलाही ठोस निकाल नाही. गावात चर्चा आहे की पोलिसांपासून बीट जमादार, पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांचं एक 'साखळी संरक्षण' दारू विक्रेत्यांना मिळत आहे.याचा स्पष्ट अर्थ असा की, गुन्हेगारीचं जाळं केवळ विक्रेत्यांपुरतंयाचा स्पष्ट अर्थ असा की, गुन्हेगारीचं जाळं केवळ विक्रेत्यांपुरतं मर्यादित नाही, तर त्याच्या मुळाशीच शासन आणि प्रशासन आहे.
गावकऱ्यांचा ठाम आरोप आहे की हफ्त्यावर जगणारे प्रस्थापित पुढारी अवैध धंद्यांना मूक पाठिंबा देतात. हाच पाठिंबा त्यांना राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोगात आणायचा असतो. दारू विक्रीचं नेटवर्क ही फक्त आर्थिक भ्रष्टाचाराची गोष्ट नाही, तर ही गुन्हेगारी राजकारणाची जहाल साखळी आहे.
गुन्हेगारी वृत्तीचे आरोपी जसे की अनमलवार आणि देबटवार यांच्या नावावर आधीपासूनच ७-८ गंभीर गुन्हे आहेत. अशा व्यक्तींना खुलेआम पुन्हा समाजात दारू विक्रीसाठी पाठबळ देणं म्हणजे गुन्हेगारीला अधिकृत परवाना देणं होय !
गावकऱ्यांचा थेट इशाराः 'हद्दपार करा, नाहीतर अक्कू यादव करू'या मागण्यांमध्ये खालील ठोस मुद्दे आहेतः
1. संजय बोरुले यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या आरोपींना तात्काळ अटक करावी.
2. अवैध दारू विक्रेत्यांना पाठबळ देणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांवर आणि संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करावा.
3. अनमलवार व देबटवार कुटुंबातील सर्व गुन्हेगारांना गावातून हद्दपार करावं.
4. गावात कायमस्वरूपी दारूबंदी लागू करून त्याची अंमलबजावणी कडकपणे व्हावी.
5. प्रशासनाने दारू विक्रीस पाठिंबा देणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांची चौकशी करावी.
पत्रकारिता केवळ 'घटना नोंदवणं' नव्हे – प्रश्न विचारणं गरजेचं आहे!
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पत्रकार म्हणून काही गंभीर प्रश्न प्रशासनाच्या गळ्याशी चटकवणे आवश्यक ठरते ते असे
अवैध दारू विक्रीची माहिती असतानाही स्थानिक पोलीस का गप्प होते?दारू विक्रीची माहिती असतानाही स्थानिक पोलीस का गप्प होते?
आरोपींविरुद्ध सात-आठ गुन्हे असतानाही त्यांना संरक्षण का दिलं गेलं?
गावात पुन्हा अवैध दारू विक्री सुरू होण्यामागे कोणता पुढारी आहे? त्याच्यावर चौकशी कधी?
संजय बोरुलेवर हल्ला होऊन २४ तास उलटले तरी आरोपी अटकबाह्य का?
राजकारणाच्या नावाखाली गुन्हेगारांना सत्तेच्या छायेत वाढवण्याचा हक्क कुणी दिला?
भेदोडा गावातील घटना केवळ एका गावाची गोष्ट नाही - ही समाजविघातक प्रवृत्तीला प्रशासन आणि राजकारण कसं पोसतं याचं ठळक उदाहरण आहे. जर यावर कठोर कारवाई झाली नाही, तर उद्या चंद्रपूर जिल्ह्यात अशे अनेक 'भेदोडा' जन्माला येतील एक कार्यकर्ता रक्तबंबाळ होतो, गाव असुरक्षिततेच्या खाईत ढकललं जातं, अवैध दारूचं साम्राज्य बळावतं, आणि शासन शांततेने बघत राहतं - ही कोणत्या लोकशाहीची व्याख्या आहे?