वादळ वारा असो की नसो तरीही विज प्रवाह होतो खंडीत
विज वितरण कंपनीच्या अभियंत्या बेजबाबदारपना मुळे ग्राहकांना मनस्ताप
गडचिरोली:-
आष्टी व जिमलगट्टा विभागीय अंतर्गत येत असलेल्या अनखोडा, कढोली, च़दनखेडी, आष्टी,मार्कंडा कं, तसेच रेपणपल्ली, कमलापूर, छल्लेवाडा, राजाराम, गुड्डीगुडम परिसरात सातत्याने विजेचा लंपडावं सुरु होत असतो तीनही ऋतुत कुठे कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत असते तर कुठे दिवसेंदिवस बत्ती गुल होत असते.
वादळवारा,पाऊस असो किव्हा नसो, नेहमीच विजेचा लपंडाव होत असतो.
विज बिल मात्र दर महिन्याला जैसे थे नाहीतर मिटर कापणार असे वाक्य संबंधित विद्युत विभागाचे कर्मचाऱ्यांकडून मिटर धारकांना बोलले जात असते.आणि फाल्ट मिटर चा बिल मात्र गगनात मावेल इतका रिडींग न घेता पाठविल्या जात असतो.
घनदाट जंगलाने व्याप्त परिसर असून पावसाळ्यात रात्री जंगली प्राणी व सरपटनारे प्राणी निघण्याची दाट शक्यता असते.त्या पासून नागरिकांना भीतीचे वातावरण निर्माण होते.
या परिसरात धानाचे मिल,झेरॉक्स मशीन, ऑनलाईन कामे,शासकीय कार्यालय असून विद्युत पुरवठा खंडित राहत असल्यामुळे शेतकरी, शाळाकरी मुले यांची अनेक कामे खोळंलबी जातात व वेळेवर कामे होत नाहीत. शाळा महाविद्यालये सुरू होणार आहेत त्या करिता विद्यार्थ्यांना लागणारे कागदपत्रे काढण्यास विद्युत पुरवठ्या मुळे विलंब होत आहे.
त्या करिता विद्युत पुरवठा विभागाने जातीने लक्ष देऊन नियमित पुरवठा करावा अन्यथा विद्युत विभाग कार्यालयावर धडक देणार असे नागरिकांचे मनोगत आहे
भरमसाठ बिलामुळे विजग्राहक त्रस्त झाले आहेत या बाबतीत कोन लक्ष घालणार अशी चर्चा सुरू झाली आहे